फाळणी| Falani
फाळणी|
फाळणी| Falani
अखंड समृध्द भारताचे स्वप्न आपल्या स्वातंत्र्य सेनानी, हुतात्मे यांनी पहिले होते. अवघा भारत हा देश जगाचे प्रतिनिधित्व करू शकतो एवढी प्रचंड उद्दत्तता या मातीत आहे. परंतु काळाचे बोट लागले व भारताचे दोन तुकडे झाले. भारत यातील मात्र भारत आणि पाकिस्तान हे देश वेगळे झाले नाही तर दोन धर्म या साऱ्यात वेगळे झाले त्यावेळी जी मानवीय अमानुष कत्तल झाली आणि असंख्य प्राणहानी झाली...ती अवर्णनीय आहे...त्याच फाळणीच्या वेळीच हा एक फोटो आहे आणि त्यावर आधारित ही कविता की मानवीय संवेनेला हलवून टाकण्याचे काम करते...
देशात आज माझ्या धर्मात वाद झाले
माझ्या हृदयातले शब्द तार तार झाले
मझ्या स्वप्नात होता देश हा माझा
आरोड्यानी माझे शब्द बेकार झाले
धर्मात कुणाच्या अजब हा हुंकार आहे
दुसऱ्या धर्मा वरती उठती तलवार आहे
माणूस म्हणुनी मी या जन्मास आलो
माणुसकीच्या गणनेत शून्य मी झालो
फळणीत जरी मझ्या देशाचे दोन भाग झाले
धर्म ही अजब मृत्यूचे जहागीर हे झाले
धर्म वेगळे जरी मनुष्य एकच आहे
शरीरात माझ्या खेळते रुधिर लाल आहे
मनोज इंगळे
Deshat mazhya dharmat vaad zhale
Mazhya hrudyatle shabd tar tar zhale
Mazhya swapnat hota desh ha mazha
Aarodyani mazhe shabd bekar zhale
Dharmat kunachya ajab ha hunkar aahe
Dusrya dgarmavar uthati talvar aahe
Manus mhanun mi ya janmas aalo
Manuskichya gananet shuny mi zhalo
Falanit mazhya jari mazhya deshache Don bhag zhale
Dhar hi ajab mrutuche jahagir he zhale
Dharm vegale jari manushya ekach aahe
Sharirat mazhya khelate rudhir lal aahe
Manoj Ingle
Post a Comment